सिल्क.. एक बोल्ड, सॉफ्ट पॉर्न अक्ट्रेस. काहीच नाही पासून तिच्या नाववर चित्रपट चालण्याइतका प्रवास. कदाचित एका उबदार प्रेमळ सोबतीची कायमच आयुष्यात राहिलेली उणीव आणि अचानकरित्या केलेली आत्महत्या.. खरंतर हा चित्रपट बघायला जाताना मनात थोडी धाकधून होतीच की एखाद्या माणसाच्या वादग्रस्त आयुष्यावर चित्रपट काढायचा म्हणून नुसताच मसाला तर नसेल ना? पण सुदैवाने एक खूप चांगलं स्क्रिप्ट तितक्याच चांगल्या प्रकारे हाताळलं गेलय. मिलन लुथरियांची आधीची फिल्मोग्राफी इतकी इंप्रेसिव्ह नाहीये पण तरीही चांगलं दिग्दर्शन म्हणता येई़ल.
हल्लीच्या काळात इतका संवादप्रधान हिंदी चित्रपट अभावानेच पाहिलाय मी. व्हेज, नॉनव्हेज, द्वयर्थी, फिलॉसॉफिकल, मनोरंजक सगळ्या प्रकारच्या संवादांची चित्रपटात रेलचेल आहे. संवादाला टाळ्या आणि शिट्ट्या पडाव्या इतकी. ८० च्या काळातला टिपिकल माहोल उभा करत, त्याकाळच्या चित्रपटांवर मार्मिक भाष्य करत या सृष्टीतल्या अस्थिरतेवर पुन्हा एकदा नजर टाकलीये.
विद्या बालन एक मुरलेली अभिनेत्री आहेच त्यामुळे तिच्या अभिनयाबद्दल काही बोलायची गरज नाही. पण कितीही नाही म्हटलं तरी फर्स्ट हाफ मध्ये ती विद्या आहे हे जाणवत राहतं. थोडी बोल्ड पण विद्याच वाटते ती. सिल्कला ज्या लोकांनी पडद्यावर पाहिलंय त्यांना सहजच हा फरक कळून येईल. पण चित्रपट जसजसा पुढे सरकत जातो तसतशी ती अधिकाधिक सिल्क वाटत गेलिये. अर्थात सेकंड हाफ मध्ये इमोशनल, तणावाचे आणि संघर्षात्मक हावभाव जास्त आहेत हे कारण आहेच पण मेक अप पण का कोण जाणे त्या भागात जास्त जमून गेलाय.
अडीच तासांचा चित्रपट काढायचाच होता तर थोडा भर तिच्या चित्रपटपूर्व आयुष्यावर द्यायला हवा होता असं मला वाटलं पण हा चित्रपट सिल्क स्मितावर नाहीच्चे असंच सगळा क्रू म्हणायला लागल्यावर या वाटण्याला फार अर्थ उरत नाही.
नसीर तर नसीर आहे पण हा चित्रपट सबकुछ विद्या आहे. त्यांची जोडी भारीच आहे. इम्रान हश्मी पण सुसह्य आहे चक्क या चित्रपटात. एकता मुळे तुषारला मिळालेला रोल तसा लहान आहे ही अजून एक जमेची बाजू. अंजू महेंद्रूने केलेला फिल्म क्रिटीकचा रोल हा अभिनयाच्या दृष्टीने चांगलाच पण सिल्कच्या व्यक्तिमत्वाचा खरेपणा तिच्या या रुपामुळे जो कळणार नाही तो स्पष्ट बोलून मांडायला त्या व्यक्तिरेखेचा उपयोग केलाय. ते ही ठिकच म्हणा.
चांगलं वाईट, आदर्श, संस्कार, बरोबर, चूक याचा काथ्याकूट न करता एक व्यक्तिचित्रण म्हणून चित्रपट पाहिल्यास नक्कीच एक चांगला चित्रपट पाहिल्याचं समाधान मिळतं. साडेतीन स्टार डिझर्व करणारा चित्रपट नक्कीच आहे हा.
हल्लीच्या काळात इतका संवादप्रधान हिंदी चित्रपट अभावानेच पाहिलाय मी. व्हेज, नॉनव्हेज, द्वयर्थी, फिलॉसॉफिकल, मनोरंजक सगळ्या प्रकारच्या संवादांची चित्रपटात रेलचेल आहे. संवादाला टाळ्या आणि शिट्ट्या पडाव्या इतकी. ८० च्या काळातला टिपिकल माहोल उभा करत, त्याकाळच्या चित्रपटांवर मार्मिक भाष्य करत या सृष्टीतल्या अस्थिरतेवर पुन्हा एकदा नजर टाकलीये.
विद्या बालन एक मुरलेली अभिनेत्री आहेच त्यामुळे तिच्या अभिनयाबद्दल काही बोलायची गरज नाही. पण कितीही नाही म्हटलं तरी फर्स्ट हाफ मध्ये ती विद्या आहे हे जाणवत राहतं. थोडी बोल्ड पण विद्याच वाटते ती. सिल्कला ज्या लोकांनी पडद्यावर पाहिलंय त्यांना सहजच हा फरक कळून येईल. पण चित्रपट जसजसा पुढे सरकत जातो तसतशी ती अधिकाधिक सिल्क वाटत गेलिये. अर्थात सेकंड हाफ मध्ये इमोशनल, तणावाचे आणि संघर्षात्मक हावभाव जास्त आहेत हे कारण आहेच पण मेक अप पण का कोण जाणे त्या भागात जास्त जमून गेलाय.
अडीच तासांचा चित्रपट काढायचाच होता तर थोडा भर तिच्या चित्रपटपूर्व आयुष्यावर द्यायला हवा होता असं मला वाटलं पण हा चित्रपट सिल्क स्मितावर नाहीच्चे असंच सगळा क्रू म्हणायला लागल्यावर या वाटण्याला फार अर्थ उरत नाही.
नसीर तर नसीर आहे पण हा चित्रपट सबकुछ विद्या आहे. त्यांची जोडी भारीच आहे. इम्रान हश्मी पण सुसह्य आहे चक्क या चित्रपटात. एकता मुळे तुषारला मिळालेला रोल तसा लहान आहे ही अजून एक जमेची बाजू. अंजू महेंद्रूने केलेला फिल्म क्रिटीकचा रोल हा अभिनयाच्या दृष्टीने चांगलाच पण सिल्कच्या व्यक्तिमत्वाचा खरेपणा तिच्या या रुपामुळे जो कळणार नाही तो स्पष्ट बोलून मांडायला त्या व्यक्तिरेखेचा उपयोग केलाय. ते ही ठिकच म्हणा.
चांगलं वाईट, आदर्श, संस्कार, बरोबर, चूक याचा काथ्याकूट न करता एक व्यक्तिचित्रण म्हणून चित्रपट पाहिल्यास नक्कीच एक चांगला चित्रपट पाहिल्याचं समाधान मिळतं. साडेतीन स्टार डिझर्व करणारा चित्रपट नक्कीच आहे हा.








0 comments:
Post a Comment